- दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
मंठा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना दि,१२ जून रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली निवेदनात पुढे म्हटले आहे कि सामाजिक विषयावर आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो कि मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांच्या आदेशा वरूण, कारण मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखावयाच्या असतील तर तेलंगणाच्या धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ हजार रुपये द्यावेत, कारण विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर मा.सुनील केंद्रेकर यांनी राज्य शासनाकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती पाहणी करून शिफारस केली आहे, केली आहे. शासनातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी शिफारस करण्याची बहुदा हि पहिलीच वेळ असावी.कारण अनेक वर्षापासून दिवसेंदिवस मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात शेतकरी वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्येची कारणे शोधत त्या आत्महत्या कशा प्रकारे थांबवता येतील,या उद्देशाने विभागीय आयुक्त मा.सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील १० लाख शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण केले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधला आहे. ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो, आशांना शेतकरी कुटुंब त्यांनी शोधलं त्यांचं समुपदेशन केले, तसेच त्यांना मदतीच आश्वासन देखील दिले आहे. साधारणता मराठवाड्यात दररोज २ शेतकरी आत्महत्या होतात याची कारणे शोधली असता शेतकऱ्याची आर्थिक बाजु सामाजिक बाजु.घरी लग्नाला आलेल्या मुली,शिक्षण अर्धवट सोडायला लागलेली मुले,नापिकी,अल्पशेती त्यामधून मिळणारं कमी उत्पन्न,सावकाराचे कर्ज,बँकेचे कर्ज,शेती पिकत नाही पिकल्यावर भाव मिळत नाही, अनेक नामावंत कंपन्यांच्या नावाखाली बोगस बी बियाणे रासायनिक खत शेतकऱ्यांच्या दरवर्षी माथी मारल्या जाते, तसेच बि बियाणे रासायनिक खत, वाढलेले दर दुकानदाराकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक, मशागतीचा खर्च,जंगली जनावराकडून होणारी पिकांची नासधूस,मुलगी लग्नाला आली लग्न होत नाही,मुलगा लग्नाला आला पढ त्याचं लग्न होत नाही खासबाब म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरीच मुलगी देत नाही हि सामाजिक खूप गंभीर गोष्ट आहे, तसेच आडते,दलाल,व्यापारी यांच्याकडून होणारे फसवणूक अशा सगळ्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी कुंटुंबातील कर्त्या माणसाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि हे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. तसेच मनसे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी दि.६ जुन २०२३ रोजी मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन करतांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत मिळावी म्हणून प्रथम निवेदन देऊन पक्षाच्या वतीने मागणी करा अशा प्रकारच्या आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करत आहोत, तसेच विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर मा.सुनील केंद्रेकर मराठवाड्यातील शेतकरी या विषयावर सर्वे करून राज्य शासनाला शिफारस केली त्यानुसार तत्काळ या विषयावर अमलबजावणी करण्यात यावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, रवि भैय्या राऊत, उपजिल्हाध्यक्ष.शरद मांगदरे,विष्णु माकोडे, मनसे महिला.सौ रेखा ताई गंगातीवारे, शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, तालुकाध्यक्ष गणेश बोराडे, उप तालुकाध्यक्ष,भारत शेळके,राम कातकडे, संजय राजगुरे,विलास तिकांडे, सतीश खांडेभराड,जगदिश चौंडीये,अमर जाधव इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,