दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- भारत कृषीप्रधान देश असून शेती अर्थव्यवस्थेचा कणा व एकंदरीत रोजगाराची जननी आहे ज्याप्रमाणे आई ही लेकरांची जन्मदाती अन् आद्य गुरु असते तसेच आपल्या भारत देशाची शेती ही सुद्धा पोटाची खळगी भरणाऱ्या भूमिहीन शेतमजूर व कष्टकर्याच्या रोजगारांचे पाहिले माध्यम तथा जननी आहे परंतु हीच शेतीभूमी आज तहानेने व्याकूळ होऊन मृग नक्षत्रातील पावसाची वाट पाहत आहे. शेत जमिनीवर अवलंबून असलेल्या शेतकरी हिरवी स्वप्न मात्र आजच होरपळून गेल्याचे चित्र सर्वदूर दिसुन येत आहे. एकीकडे वारकरी विठुरायाच्या पंढरीला घरदार सोडून आपली परंपरा निभावत व सुख पदरात पाडून घेण्यासाठी पांडुरंगाच्या पायी वारी दिंडीत मुखी हरीनामाचा गजर करत चालतो आहे.तर दूसरीकडे मात्र रखरखत्या उन्हात त्याने राब राब राबुन मशागत धरणी माय मात्र पावसाच्या थेंबासाठी व्याकुळे होऊन बसली आहे. आत खरिपातील सर्वच पिकाच्या संशोधनातील उत्तम कार्यकाळ हा जूनच्या त्या आठवड्यापासून सुरू होता परिणामी मग नक्षत्रात धरणीमाईच्या पोटात रूजलेल बी हे भरघोस पिक देणार व राब राब राबणाऱ्या शेतकयांची हिरवी स्वप्न साकारनारं मृगजळ आहे आज समस्त परिसरातील जगाचा पोशिंदा रात्रंदिवस आकाशाकडे पाहून येरे येरे पावसा म्हणून पावसाची आस लावून आळवणी करत असल्याचे चित्र सध्या पेठवडज सर्कल याभागामध्ये शेता शिवारातील बांधावर कपाळाला हात लावुन बसलेल्या शेतकऱ्याकडे पाहुन दिसुन येत आहे
विशेष म्हणजे जून पहिला आठवडा हा बहुसंख्या पिकांना वरदान असून या महिन्यात रुजवलेले बीज हे प्रामुख्याने भरघोस उत्पन्न देणार ठरते !! या म्हणीनुसार बहुसंख्य शेतकरी ही आपली पेरणी मृग नक्षत्रात होण्यासाठी देव पाण्यात ठेवतात. परंतु आज आकाशाकडे पाहून तर ढग तर सोडाच पण पाण्याचा थेंब सुद्धा मृग नक्षत्रामध्ये पडतो की नाही. , याची शंका आहे. तर काळ्या कुटु ढगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उरी पावसाबाबत निराशाच दाटल्याने स्वप्न आजच रखरखत्या उन्हात होरपळून गेल्याचे दुःख जगाच्या पोंशिदाला आज होत आहे