दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना – गेली पंचवीस वर्षे सत्तेत राहून घनसावंगी मतदारसंघाचा कोणताच विकास केला नाही आमदार राजेश टोपे यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था व कारखान्यांचा विकास करण्याचे काम केले असून त्यांनी मनाची तर नाहीच पण जनाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती टोपेनी फक्त लोकांना टोप्या घालण्याचे काम केले त्यांना येत्या काळात आम्ही टोपी घातल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वडीगोद्री येथे लाभार्थी संमेलन महा- जनसंपर्क अभियानाच्या सभेत बोलताना केले पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की आमदार टोपे हे मतदारसंघात उसाचे राजकारण करून दादागिरी करत आहे हे राजकारण आता आम्ही चालू देणार नाही सत्तेत आल्यावर सरपंच तरी गावाचा विकास करतो परंतु टोपे यांना जनतेच्या विकासाचे काहीच पडले नाही त्यांना फक्त सत्ता व पैसा पाहिजे हे चक्र गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहे ते आता बंद पाडण्याची ताकद आपणा सर्वांमध्ये आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते त्यांच्या बारा वर्षाच्या काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला नाही त्यांचा सर्वस्वी अभिमान असायला पाहिजे भारतात मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचे सरकार होते ते इतर देशाच्या इशार्यावर चालत होते परंतु आता भारतात हिंदुत्ववादी संघटनेचे प्रभुत्व असलेले सरकार आहे पूर्वी इतर देशातून कर्ज घेतले जायचे परंतु आता भारत दुसर्या देशाला कर्ज देत आहे पूर्वी इतर देशातून शस्त्र अस्त्र आयात करत होते परंतु आता भारत देश दुसर्या देशाला शस्त्र-अस्त्र निर्यात करत आहे कोविड काळात मोदी सरकार नसते तर भारतात कोविड लस आयात करावी लागली असती कोविड काळात भारताने स्वतः कोविड लस तयार करून इतर देशातही लस पुरविली मोदी सरकारने शिक्षणात ही पंधरा टक्के जागा चेअरमन साठी तर 85 टक्के जागा गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत हे नियम लागू केल्याने विद्यार्थ्यांचा मोठा फायदा झाला अनेक वर्षापासून इतर देशाप्रमाणे लागू असलेली कलम, मोदी सरकारने 370 कलम रद्द केली इतर शासकीय कर्मचार्यांना सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मानधन मिळते त्याप्रमाणे शेतकर्यांनाही मोदी सरकारने वर्षाला सहा हजार रुपये दिले तसे आता राज्य सरकारी वर्षाला सहा हजार रुपये देणार असून शेतकर्यांच्या खात्यात आता वर्षाला 12 हजार रुपये येणार आहेत गेल्या पाच वर्षात शेतकर्यांना खूप मोठा पिक विमा मिळाला परंतु मागील अडीच वर्षात आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांना मात्र पिक विमा पासून वंचित राहावे लागले आपण भाग्यवान आहोत पारदर्शक काम करणार्या पक्षात काम करतो असेच पुढे जोमाने काम करा 2024 मध्ये बहुमताने सरकार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असे आमदार पाडळकर यांनी बोलताना सांगितले