दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळातील केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना ग्रामीण व शहरी भागात पोहचविण्याचे काम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांनी महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत संयुक्त मोर्चाची बैठक ही भाजपा जालना ग्रामीण व शहर अंतर्गत संयुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने 30 मे 2023 रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव मा.नरेद्र मोदीजी यांच्या नेतृत्वखालील सरकारला 9 वर्ष पुर्ण होत आहेत या निमित्त 30 मे ते 30 जुन 2023 या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्रात भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे व उप मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व जालना जिल्हा व जालना लोकसभेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष जनसंपर्क अभियान व त्या अंतर्गत् विविध कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. दिनांक 14 जुन 2023 रोजी भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण व शहर मंडळाची बैठक भाजपा उपाध्यक्ष तथा जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे म्हणाले की, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जीच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत असून भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे अधिक मजबूत करुन आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. या अभियानाचा उपयोग घेऊन जालना विधानसभा मतदारसंघात बुथ स्तरावर व्यापक जनसंपर्क,लाभार्थी संपर्क,समाजातील विविध घटकांशी संपर्क,जेष्ठ कार्यकर्त्याशी संपर्क करुन अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळया कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, असे भास्करराव पाटील दानवे यांनी जालना विधानसभा ग्रामीण व शहर मंडळाच्या बैठकीत पदाधिकार्याच्या समोर बोलतांना व्यक्त केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, प्रदेश कार्य समिती सदस्य,रामेश्वर पाटील भांदरगे, प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस अतिक खान, भाजपा प्रदेश निमंत्रीत सदस्य सौ.संध्याताई देठे, जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सतिष जाधव, बाबुराव मामा खरात, सुहास मुंढे, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, शशीकांत घुगे, अर्जुन गेही, डॉ.गोविंद भताने, प्रदेश वैद्यकिय संयोजक डॉ.अमोल कारंजेकर,सुधाकर खरात, डॉ.तुकाराम कळकुंबे, सुनिल खरे, सुभाष सले,मराठवाडा युवती प्रमुख शमिष्ठा कुलकर्णी, दिलीप अर्जुने सर,सय्यद ईम्रान, सुरेश कदम, सतिश केरकळ,अमोल धानुरे, कैलास उबाळे, अनिल सरकटे, संजय डोंगरे, श्रीकांत शेलगांवकर,मनोज बिडकर, परसराम तळेकर,अमरदिप शिंदे,आनंद झारखंडे, रवि आग्रवाल, मुकेश राठोड,मुकेश चव्हाण,सोमेश काबलिये,सौ.सकुबाई पनबिसरे,अरुणा जाधव,गिता राजगुढे,वैशाली बनसोडे,निवृत्ती गायकवाड,बद्रीनाथ वाघ,दत्ता जाधव,नारायण जाधव,ज्ञानेश्वर मोरे,सतिषचंद्र प्रभु, शारदा काळे, जुनेद मिर्झा, नदीम कुरेशी,अभिजीत अंभोरे,आकाश बावरी, नामदेव ढाकणे,करण झाडीवाले,रोहीत नलावडे,अमन मित्तल, ज्ञानेश्वर राठोड,रवि कायंदे, विनायक पवार,राजु उगले,योगेश शिंमगे, प्रदीप देठे, गोविंद ढेंबरे,सुधाकर उबाळे,योगेश सामलेटी,संतोष औरंगे,विकास कदम,नागेश अंभोरे,कृष्णा गायके,उध्दव ढवळे, सुरेंद्र शेडूते,राम जाधव आदीसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.