दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :अंजनगाव सुर्जी शहरात माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.परंतु वन विभागाने या माकडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी अंजनगाव सुर्जीकर वारंवार करत आहेत.
१५ दिवसांपूर्वी सुर्जी भागातील दुर्गा माता मंदिर परिसरातील एका लहान मुलीला एका माकडाने घट्ट पकडले होते.त्यामुळे ती छोटीशी मुलगी ८ दिवस शॉक मध्ये होती.तर आता बुधवार २ ऑगस्ट २०२३ रोजी तीन व्यक्तींवर माकडाने हल्ला केला होता.या माकडाच्या हल्लेत एक युवती,एक महिला तर एक पुरुष व्यक्तीचा समावेश आहे.६२ वर्षीय पुरुष व २७ वर्षीय युवती जखमी झाले असून ३६ वर्षीय महिलेच्या उजव्या पायाला माकड चावल्याने तब्बल पन्नास टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माकडाच्या उपद्रवापायी आर्थिक नुकसान समवेत जीवितास सुद्धा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे शहरातील नागरिक हादरलेले असून रोष दिसत आहे.तर वन विभागाला यावर कशाप्रकारे कार्यवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.