मोबाईल फोनने घरा घरात पडताहेत वादाची ठिणगी… देगलूर: हल्ली आपल्या परिसरामध्ये लग्नानंतर माहेरची मंडळी मुलीच्या सतत संर्पकात असतात. दिवसभरात अनेक वेळा बोलन सुरूच असते. प्रत्येक लहान मोठया गोष्टींमध्ये आई चा हस्तक्षेप राहल्याने लग्न होउन नविन घरात गेलेली मुलगी आपल्या पति व सासर पक्षातील सदस्यांशी नात नाही जोडु शकत. हेच कारण आहे की, माहेरच्या हस्तक्षेपामुळे मुली आपला संसार थाटु शकत नाही.
माहेरच्या हस्तक्षेपा मुळेचती नवविवाहित मुलगी पहील्या दिवसापासुनच सासर पक्षाच्या सदस्यांकडे वेगळ्याच नजरेने पाहत असते. लग्नाच्या काही महीण्यानंतर सुद्धा ती आपल्या आईसोबत दिवसभर मोबाईलवर जुडलेली राहते. आईच्या दिशा निर्देशानुसारच ती सासरी वागत असते ज्यामुळे आज शेकडो नवविवाहित मुलींचे संसार सुरु होण्यापुर्वीच तुटतांना दिसतात. पति- पत्नी मध्ये फार्कती पर्यंतची परीस्थीती निर्माण होते. गाव पंचायत ते कुटुंब न्यायालयात सुद्धा पाहुनलक्षात येते की, जास्तीत जास्त प्रकरणात माहेर कडील लोकांच्या सततच्या हस्तक्षेपामुळेच नाते संबंध तुटल्याचे पहायला मिळत आहे. प्रत्येक लहान मोठया गोष्टींमध्ये माहेरकडील मंडळी हस्तक्षेप करतात. मोबाईल फोन नाते संबंध जुडण्यापूर्वीचतोडत असल्याचेचित्र अलीकडे पहावयास मिळत आहे. लग्न करून मुलगी सासरी पोहचते तेव्हापासूनसर्वात जास्ततिचबोलन माहेरकडील मंडळी विशेषतः आई सोबतच सुरु असते. सासुवसासच्या प्रत्येक गोष्टी ती आईसोबत शेअर करीत असते. आणी माहेर कडील मंडळी तिला जास्तीत जास्त अधिकार संपन्न बनविण्यासह प्रत्येकाला बोटांवर नाचविण्याचा सल्ला देत असतात. हेच कारण आहे की, नवदाम्पत्यां मध्ये सुद्धानात तयार होत नाही. जे नात पति पत्नी करीता आवश्यक असते. या सोबतच पत्नीच्या रुपाने नवविवाहीत मुली आपला संसार थाटू शकत नाही. यामुळेच पंचायती व न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये दिसुन येते की, या सर्व प्रकरणात आईची भुमिकाच संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे. जर तुम्हाला लग्नानंतर आपल्या मुलीचा संसार चांगल्या पद्धतीने थाटल्या गेला पाहीजे असे वाटत असेल तर लग्नानंतर मुली सोबत महत्वपुर्ण गोष्टीं करीताच संपर्क करा. नाहीतर ईश्वरांन दिलेलं सुंदर जीवन तुमच्या मनासारखं जगता येणार नाही.
Related Stories
3 days ago