दैनिक चालू वार्ता
नांदेड जिल्हा (दक्षिण) प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-लोहा कंधार तालुक्यातील गेल्या जुलै महिण्यात खूप मोठा पाऊस झाल्या मुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन जमीन खरडून गेली आहे व अजूनही पिके पाण्याखाली आहेत परंतु महसूल कृषी विभाग व जिल्हा परिषद च्या अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधावर न जाता सर्वे केला व दोन्ही तालुक्यात शून्य टक्केवारी निकष सादर केला गेल्यामुळे पुढील अनुदान अथवा विमा मंजूर न होण्यास कारणीभूत ठरणार आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड हवालदिल झाला आहे तरी या दोन्ही तालुक्याची पुनर सर्वे करून संबंधित विभागास आदेशित करून येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत खरा अहवाल देऊन शेतकऱ्यास दिलासा द्यावा अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आमरण उपोषण सुरु करण्यात येईल.दोन्ही तालुक्यातील पर्जन्य मानाचा शासकीय अहवाल पाहून निकष न लावता तालुकास्तरीय यंत्रणांनी कसा जावाई शोध लावला हे एक कोडे आहे, त्वरित दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष श्री भास्कर गोविंदराव पा.शिंदे जोमेगावकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष श्री किरण गव्हाणे, प्रदेश प्रवक्ते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड डॉ.बालाजी पेनूरकर,माधव पा.वडवळे, अंकुश पाटील,राम पा.जाधव, घनश्याम पाटील यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.