कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू करा-कॉ.हिम्मतराव गवई…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाळा व राजना पूर्णा येथील शालेय पोषण आहार कामगारांना कामावरून कमी केल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर १ ऑगस्ट २०२३ पासून कामगारांनी आमरण उपोषण छेडले आहे.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना रुजू करा,संबंधित शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करून कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मुख्याध्यापक यांची बदली करा आणि शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांना कमी करण्याचा अधिकार पंचायत समिती अधीक्षक यांना देण्यात यावा अश्या मागण्यांना धरून उपोषणकर्ते शालेय पोषण आहार युनियन जिल्हाध्यक्ष हिम्मतराव गवई,लीनाताई पाथरे,वसंतराव मारुडकर आणि मालाताई मारूडकर यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली.उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून गेल्या ४ दिवसांपासून उपोषण मंडपाला मात्र,अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.