दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे..
पुणे/इंदापूर:सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीस सेल च्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल सावता परिषदेच्या वतीने निमगाव केतकी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे नियोजन सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरु यांनी केले होते.तसेच लवकरच निमगाव केतकी येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले जाणार असल्याचेही संतोष राजगुरु यांनी सांगितले.
यावेळी आपल्या भाषणांमध्ये सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये छोट्या छोट्या ओबीसीतील घटकांना न्याय देण्याचे काम आपण करणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास नक्कीच मी ओबीसीचे संघटन वाढवून सार्थ ठरवेल. सावता परिषद खूप जोमाने महाराष्ट्रामध्ये सक्रिय होऊन संघटनही वाढेल. उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ओबीसीच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्यावरती रस्त्यावरती उतरून भविष्यात लढाई केली जाईल, संघर्ष केला जाईल, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घटकांना न्याय देण्याचे काम आपण करणार आहे.
संतोष राजगुरू हा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ने मला समाजामधला हिरा शोधून दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून खांद्याला खांदा नव्हे तर सावलीप्रमाणे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून संघटना स्थापनेपासून आज पर्यंत खूप मोठे योगदान संघटना वाढीमध्ये संतोष राजगुरू यांनी केलेल आहे. माझ्या या संघटनेच्या कामांमध्ये निमगाव केतकी गावाने तसेच तालुक्याने मला खुप भरभरून प्रेम दिलेल आहे.हे मी कदापी विसरू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी इंदापूर तालुक्यातील सावता परिषदेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.