दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार) :- स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कौठा वासियांना पावसाळ्यात मन्याड नदी पार करण्यासाठी त्यांच्या पुढे मोठे संकट उभे असते. जिव धोक्यात घालून नदी पार करावी लागते दर निवडणुकीत आश्वासन देऊन बंधारा मीच करणार ही घोषणा गावकऱ्यांना फसवी वाटू लागली आहे अनेक आजी-माजी नेते मंडळीनी नारळ फोडून सुद्धा बंधारा अद्याप झाला नसल्याने शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी नदीपार करताना थर्माकोलचा वापर करावा लागतआहे.
कंधार तालुक्यातील कौठा हे मुख्य बाजारपेठेचे गावं आहे शाळां महाविद्यालय किराणा भुसार कापड कृषी सेवा केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना मध्यवर्ती बँक आदि कामासाठी शेतकरी शेत मजूर विद्यार्थी कर्मचारी यांना राहटी, वरवट ,जाकापूर ,शिरशी मंगनाळी,कळका आदि गावातील नागरिक खरेदी विक्रीसाठी बाजारपेठेत येतात तर कौठा येथील ६० टक्के जमीन मन्याड नदीपलीकडे असल्याने पावसाळ्यात नदीला पूर येताच वाहतूक पूर्णपणे बंद होते.तर मानार प्रकल्प ओहरफूल झाल्यास नदिचे पाणी २ ते ३ महिने कमी होत नाही नदीला पुर येताच नदी पलिकडील शेतकऱ्यांना थर्माकोलचा आधार घेऊन जिव धोक्यात घालून नदी पार करावी लागते दरवर्षी पावसाळ्यात होणारी हेळसांड थांबवावी यासाठी आजी माजी आमदार यांना साकडें घातले निवडणूक होताच लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा नंतर हि शेतकऱ्यांची हेळसांड काही थांबली नाही एकीकडे स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव साजरा होत असला तरी येथील शेतकऱ्यांना पुलं व बंधार्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे आ शामसुंदर शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या काळात बंधारा व पुल मंजूर करण्यात होते मात्र शिंदे फडणवीस सरकार येताच सदरिल कामास स्थगिती दिली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले लोक उपयोगी पडेल असे कामास राजकीय नेत्यांना विसर पडतो कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नविन अंदाज पत्रक तयार करून पाठवले असल्याचे सांगितले
बंधारा व पुलं का गरजेचा आहे:-मन्याड नदीवरील पूल व बंधारा झाल्यास रहदारी साठी राहाटी ,वरवंट ,मंगनाळी ,कळका हि गावे आंबुलगा व कौठा या दोन राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातील नांदेड मुखेड नरसी जाण्यासाठी गावकऱ्यासह नदी पलिकडील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी जाण्या येण्यासाठी व कौठा, तेलूर, जाकापुर गावचा पाणीपुरवठा सह शेकडो हेक्टर शेती सिंचखाली येऊन याभागाचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. अशी मागणी कौठा व परिसरातील अनेक गावांनी केली आहे.