दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार) :- येल्लुर व मसलगा गावातील शेतकऱ्यांनी भाजपा नेते भावी आमदार व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्याकडे पांदण रस्तांची मागणी केली. मागणी करताच व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सांगितले काम कधी चालु करु ते सांगा मंजुरी येईल जाईल तुम्ही त्याची काळजी करु नका. तुम्हाला पांदण रस्त्याची अडचण असेल तर आपण लगेच काम चालु करु शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही तुमच्या पाठीशी व्यंकटराव पाटील गोजेगावकर उभा आहे. मसलगा नगरीचे युवा नेते बालाजी पाटील वडजे (भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका उपाध्यक्ष) यांनी सांगितले की साहेब तुम्हीच या जनतेच्या मनातील आमदार आहात त्यामुळे तुम्ही पांदण रस्त्याचे काम करु शकता याची शेतकऱ्यांची तुमच्याकडे अपेक्षा आहे आज तुमच्याकडे सर्व शेतकरी आले आहेत कारण तुम्ही ही अडचण सोडु शकता हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी बसायचे नाही तर या जनतेला तुम्हाला आमदार म्हणून बघायचे आहे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कि तुम्ही विधानसभा लढविणार आहात की नाही. जनतेसमोर तुम्ही भुमिका स्पष्ट करा अशी विनंती केली .व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी त्यांच्या भाषणातुन सांगितले कि मुखेड कंधार विधानसभेमध्ये जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुमच्या माध्यमातून बदल घडवायचा आहे येणाऱ्या काळात तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा असावा रात्रीच्या १२ वाजला जर कोणी फोन केला तर उचलणारा, व त्यांच्या घराचा दरावाज्याला गेलं तर आत मध्ये या म्हणणारा सर्वसामान्य लोकांना उध्दट न बोलणारा , प्रत्येकांच्या अडीअडचणी सोडवणारा कुठला ही भेदभाव न करणारा असा जर आमदार पाहिजे असेल तर तुम्हाला बदल घडवायचा आहे आणि तुमच्या जे मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे ती बाजुला काढुन टाका मि तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही मसलग्याचे बालाजी पाटील वडजे आणि ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांच्या माध्यमातून पेठवडज सर्कल कुरुळा सर्कल यांच्या माध्यमातून माझी भूमिका स्पष्ट करुन टाका असे ही त्यांनी सांगितले तुम्हाला सांगत आहे आता पर्यंत तालुक्या मध्ये ५८ किलो मीटर पांदण रस्ते आपण पुर्ण केलेले आहेत मंजुरी येईल तेव्हा येईल तुमच काम उद्या चालु करतो असे ही ते म्हणाले. नांदेड जिल्हाचे धाडशी नेतृत्व माझ्या पाठीशी आहे आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे माझ्या कायम पाठीशी आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यभर विकासाची गंगा वाहात आहे. आणि या विकासाच्या गंगेच नेतृत्व माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला काळजी करण्याची गरज नाही तुम्ही कामाला लागा येणाऱ्या काळामध्ये आपली ही विधानसभा जिंकून मराठवाड्यातील विकासाच्या बाबतीत एक नंबरला आणायचे आहे आणि त्यांनी बोलता बोलता एक सांगितले ३९ वर्ष झाले राजकारणामध्ये आहे परंतु कधी घमंड केल्या नाही आमच्याकडे जर एक दिवस लोक अडचण घेऊन नाही आले तर मला करमत नाही. माणसाची श्रीमंती पैसे असतील तरच माणूस श्रीमंत असतो पण मला
माझ्या सोबत लोक असतील तरच मि श्रीमंत आहे असे वाटते. यावेळी मसलगा नगरीचे युवा नेतृत्व बालाजी पाटील वडजे यांच्या नेतृत्वाखाली गावातील उपसरपंच केरबा पाटील वडजे, ग्रा. स. मनोहर पा वडजे,आबाजी पा वडजे, श्रीराम पा वडजे, सुरेश मा पा वडजे,प्रमोद पा वडजे, प्रा. गजानन पा वडजे,राजेंद्र येल्लेबोईनवाड, बाबुराव बोईनवाड,आनंदा नरवाडे,बाळु पा वडजे,किरण पा वडजे व येल्लुर नगरीचे युवा नेते ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्ती अध्यक्ष विश्वांभर पाटील शिंदे मा सरपंच निळकंठराव पा शिंदे,मा उपसरपंच गणेश पा आखरगे, विठ्ठल बळीराम पा आखरगे ,माधवराव गुरूजी आखरगे चंदर पा शिंदे,रामजी पा शिंदे,सिताराम पा आखरगे धोडिराम पा शिंदे,हानमंतराव पा आखरगे,व्यंकटराव पा आखरगे देविदास पा शिंदे,शिवाजी पा शिंदे,बालाजी पाटील शिंदे संभाजी पाटील शिंदे ,दत्ता पाटील आखरगे नागोराव पा शिंदे अंकुश पा शिंदे ज्ञानेश्वर पा शिंदे,महेश पाटील शिंदे,राज पा शिंदे,शिवराज पा शिंदे,साईनाथ पा शिंदे ग्रा. स.अविनाश ननुरे,विठ्ठल ननुरे, ज्ञानेश्वर पा मित्र परिवार उपस्थित होते या सर्वांंना व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या तर्फे दस्ती टोपीचा मानसन्मान करण्यात आला.