म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची मंजुरी…
म्हसळा – रायगड – प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा -महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात एनडीए आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकार मध्ये सामील झालो आहोत हा राजकिय निर्णय घेताना प्रथम आमच्या सारख्या अनेक सहकाऱ्यांचा आयुष्य हा धर्मनिरपेक्ष लोकशाही विचाराचा आणि शाहुफुले आंबेडकर यांचे सिद्धांतात गेला आहे.
सामजिक समता आणि बंधुता या विचारांशी आम्ही जराही तडजोड न करता तसा एनडीए मधील नेत्यांजवळ विचार विनिमय करून आमची आयडॉलॉजी अर्थात विचारसरणीला जराही धक्का न लावता केवळ आणि केवळ विकास कामांना गतिमान करून महाराष्ट्राला अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही एनडीए सरकारमध्ये सहभाग घेतला असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत वार्तालाप करताना सांगितले
या वेळी त्यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आणि महिलांच्या प्रश्नांना अधिक गतिमान करण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले.केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयपणे काम करण्याचे ठरवले असून पक्षातून अनेकवेळा निवडून येणाऱ्या वरिष्ठानी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून अधिक प्रगतीवर नेण्याचा संकल्प केला आहे.नवीन राजकीय भूमिका घेताना आदर्श धर्मनिरपेक्ष व शाहू,फुले आंबेडकर यांच्या विचारांना धक्का न लावता सरकारमध्ये गेलो
असल्याचे मत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मांडले.संघराज्याच्या कल्पनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तसे विचार स्पष्ट करताना केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असतील तर संयुक्तपने काम केले पाहिजे असा खुलासा
म्हसळा येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते तेव्हा ते बोलत होत.यावेळी त्यांनी म्हसळा तालुक्यासाठी 200 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या कामांचे वाचन केले.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघात 2009 पासून काम करत आलोय. मागील काळात अदिती तटकरे यांना याच मतदार संघातून विधान सभेवर जाण्याची संधी मिळाली व पालकमंत्री होता आले यावेळी या मतदार संघात अनेक विकास कामे मंजुर करण्यात आली होती परंतु ठाकरे सरकार पडल्या नंतर काही कामांना स्थगिती देण्यात आली होती ही स्थगिती आम्ही मागील दोन महिन्यांत उठवण्यात यशस्वी झालो.कोकण आपत्ती समीकरण अंतर्गत आराखड्याचा पाठपुरावा करून म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यासाठी 457कोटी75लक्ष 22हजार एवढा निधी उपलब्ध झाला आहे.यामध्ये म्हसळा तालुक्यातील खरसई,तोंडसुरे,खारगाव,काळसुरी या गावातील खारभुमी विकासासाठी 10 कोटी 57 लाख,बहू उद्देशीय निवारा केंद्र उभारण्यासाठी खरसई,मेंदडी,निगडी पाभरे या गावांसाठी 61 कोटी,म्हसळा तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनी साठी 95 कोटी 69 लाख,धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी,म्हसळा शहरातील जानसई नदीचे सुसोभिकरण करण्यासाठी निधी उपलब्ध केला असून शहरातील 42 कोटी रुपयांची पाणी योजना दिवाळी आधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन दिले.मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रस्ते मंजूर होऊन आले आहेत. पंतप्रधान सडक योजने अंतर्गत टोल मार्गे आंबेत बगमांडला रस्ता, साई ते लिपनी वावे रस्ता मंजूर झाला असून मांदाड माजगाव म्हसळा रस्ता सुचवला असल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये खा. सुनिल तटकरे यांनी दिली.यापुढे खा.तटकरे यांनी 29 मंत्रीपैकी अदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री असल्याने महिलांसाठी अनेक योजना येणार असून महिलांना उद्योग धंद्यात मदत होणार असल्याचे सांगून आपण नवीन राजकीय भूमिकेत आयडोलॉजीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष नाजीम हसवारे,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,महिला जिल्हा चिटणीस रेश्मा कानसे,तालुका अध्यक्ष समिर बनकर,जेष्ठ नेते अंकुश खडस,रियाझ फकी,पाभरा सरपंच अनिल बसवत,ओबीसी सेल अध्यक्ष अशोक काते,माजी सभापती छाया म्हात्रे,महिला तालुका अध्यक्षा मीना टिंगरे,गण अध्यक्ष नाना सावंत,युवक गण अध्यक्ष किरण पलांडे,सरपंच खोत मॅडम,युवक शहर अध्यक्ष नईम दळवी,शानवाज उकये,शेखर खोत,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,प्रभारी नगराध्यक्ष संजय दिवेकर, नगरपंचायत गट नेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, सभापती सुमय्या आमदानी, नौसीन चोगले,सलीम चोगले,सलीम काळोखे,प्रकाश गाणेकर,रफी घरटकर,मंगेश म्हशीलकर आदी मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.