दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – खारगावं खुर्द (सकलप) येथील स्मशानभूमी मध्ये गावातील सेवाभावी जनसेवा मंडळाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. या सेवाभावी मंडळाच्या वतीने गेली सात ते आठ दिवस गावातील रस्ते, एस. टी. निवारा शेड, गटार यांची स्वच्छता कार्यक्रम केला जात आहे गावातील रस्ते, गटार आणि स्मशानभूमी, एस टी पिक अप शेड दुरुस्ती आणि स्वच्छता करण्या संबधी ग्रामसभेत ठराव मांडून आणि त्यांच्याकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून लोकांनी सांगितले मात्र सरपंच यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने गावातील सेवाभावी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण विरहित सेवाभावी मंडळाची स्थापना करून गावाची गेली ७ ते ८ दिवस स्वच्छता करत आहेत…
मात्र गावातील सरपंच हे त्यामध्ये कुठेही सहकार्य करत नाही,
सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत. जनतेने ग्रांमपंचात मध्ये निवडून आपल्याला पाठवले ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी. वारंवार निष्क्रीय ग्रांमपंचातील तक्रार करून हि मागणीला केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.
त्यामुळे सरपंच गरीब असो वा श्रीमंत असो लोकांचे गाऱ्हाणे ऐकणारा असावा अशी जनतेची माफक अपेक्षा आहे.अनेक समस्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून गावातून ते दिघी रोड पाच वर्षांपासून गटार साफ केलेली नसून गाळ आत साचलेला आहे.अश्या निश्क्रिय ग्रामपंचायतीच्या कारभारावर न राहता ग्रामविकास मंडळाने स्वता पुढाकार घेऊन स्वच्छता एकच ध्यास म्हणून गाव हीताच्या कामासाठी सर्व गावकऱ्यानी एकत्र येण्याचे आवाहन केले व जास्तीत जास्त गावकऱ्यांनी स्वच्छता असेल, किंवा कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी कचरा कुंडिचा वापर करावा, वेष्ठकचरा गावापासून दुर टाकावा जेणेकरून आरोग्यास हानी पोहचणार नाही आरोग्य उत्तम राहील.
तरुणांना हि या कामात हिरारीने सहभाग घ्यावा असे हि आव्हान करण्यात आले आहे. आपली काळजी घेणारा कोणी वाली नाही. गावपातळीवर अनेक योजना आहेत ते राबवणारेच झोपेचे सोंग घेतले आहेत तरी आपण प्रयत्न करून योजना, विकास कामासाठी योगदान देऊ गाव समृद्धीकरण करू असे गाव विकास मंडळाने ग्रामपंचायतच्या कारभाराबद्दल मतव्यक्त केले.