दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले…
अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (चिखलदरा) : दाट धुक्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळल्याने ४ जण ठार,तर ४ जण गंभीर जखमी झाले. चिखलदरा-परतवाडा मार्गावरील मडकीजवळ रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.मृत व जखमी आदिलाबादचे (तेलंगना) रहिवासी असून ते पर्यटनासाठी चिखलदरा येथे जात होते,अशी माहिती मिळाली आहे.
सविस्तर माहीती अशी की,तेलंगना राज्यातील आदिलाबाद शहर व जिल्ह्यातील आठ जण पर्यटनासाठी कारने चिखलदराकडे निघाले होते.परतवाडा मार्गावर रविवारी सकाळी धुके पसरल्याने चालक शेख सलमान शेख चांदचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार खोल दरीत कोसळली.या अपघातात चालक शेख सलमान शेख चांद (वय २८),शिवा कृष्णा सुधरमा अदांकी (वय ३१),जी.वैभव लक्ष्मणा गुल्ली (वय २९) आणि वाना पार्थी कोटेश्वर राव (वय २७) हे चौघे ठार झाले.
तर जी.श्यामसुंदर लिंगा रेड्डी वय ३०),के.सुमन काठिका (वय २९),के.योगेश यादव (वय ३०) आणि हरीश मुथिनेनी (वय २७) हे गंभीर जखमी झाले.यातील के सुमन काठिका व के.योगेश यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावतीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.सर्व तरुण हे तेलंगणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी आहेत.