दै चालु वार्ता मोहन आखाडे
औरंगाबाद प्रतिनिधी
शिऊर येथील विजेचे विविध प्रश्न व सतत खंडित होणारा वीजपुरवठा या बाबत ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिऊर येथे महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
दि.२५ {सोमवार} रोजी सकाळी १० वाजता सुरु झालेले उपोषण समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सायकांळी उशिरा सोडण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असणाऱ्या शिऊर गावात विजेची मोठी समस्या भेडसावत आहे. सतत खंडित होणारा वीजपुरवठा, अवाजवी वीज दर आकारणी, गावातील जीर्ण झालेले विद्युत पोल व तारा त्वरित बदलण्यात यावे आदी मागण्यासाठी उपोषण करण्यात आले. महावितरणचे उपअभियंता पुंडे,सहाय्यक अभियंता आर आर मोरे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन दीपावलीपूर्वी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.
या उपोषणात ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव, अशोक चव्हाण, सुनील खांडगौरे, माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे, अकबर भाई, लड्डूभाई शेख, सर्जेराव घोडके, अनिल भोसले, संजय जाधव,विजय झिंजुर्डे,एकनाथ जाधव, अमीर सैय्यद, शेरखा पठाण, शुभम सूर्यवंशी, अर्शद शेख, राजू शेख, मच्चींद्र जाधव, रहीम शेख, रइस पठाण, रफिक शेख, जावेद शेख, इस्राइल शेख,अभिषेक गिरी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.