दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मा.अंकुश कडू साहेबांनी मला परवाच्या दिवसभरच्या मुलाखतीत डोळे पाणावून सांगितले, “गुरूजी, आम्ही माझ्या बालपणी शेतात खुपच खपलो, काबाडकष्ट व मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह चालवित होतो. आमची परिस्थिती खुप हालाकीची होती, त्यामुळे आम्ही सर्वजण शेतमजुरी करण्याकरीता जात होतो. लहानपणी खुप कष्ट सोसले हो! लहानपणासूनच मला गरजूंना मदत करण्याची आवड होती आणि आजही आहे. माझे शेत हे रोडवर असल्याने अनेक अपघात घडतात, तेव्हा कशाचीही पर्वा न करता अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातो. आता तर अन्याविरुद्ध लढा देण्याची माझ्यात कुवत निर्माण झाली; ती याच वृत्तपत्रातून दाखवून देत आहे, ते तर तुम्ही बघताय. माझ्या शिक्षणात आर्थिक अडचणी खुप आल्या. अगदी सकाळी घरोघरी दैनिक अंक टाकून शेतात काम करून पुस्तक घेण्याची वेळ आमच्यावर आली होती. काम करणे आणि शाळेत जाणे, एवढेच मला माहित होते. ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या घेण्यास पैला पै जोडावी लागायची. ते आमचे अतिशय वाईट दिवस होते हो गुरूजी! कणभर अन्न तर सोडाच, नुसत्या पाण्यावरच काही दिवस काढले; ते दिवस आठवले तर आजही डोळ्यात पाणी येते!” हे ऐकून माझेही मन गहिवरून आले. म्हणून म्हणतोय, की साहेब! तुम्ही आज वाचकांसमोर अतिशय प्रेरक व्यक्तित्वाचे धनी झालात, वाढदिवसाच्या मंगलप्रसंगी तुमचे खुप खुप अभिनंदन! त्यांच्या मुख्यसंपादक या बहुमानाच्या पदावर आरूढ होईपर्यंतची ज्ञानवर्धक माहिती अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूंजीच्या शब्दशैलीतून अवश्य वाचाच… संपादक._
सर्वांनी अवश्यच प्रेरणा घ्यावी, असा ज्यांचा अगदी बालपणासून खडतर जीवनप्रवास सुरू आहे; त्या आपल्या प्रचंड वाचक पसंतीच्या अत्यंत लोकप्रिय अशा दैनिक सुवर्ण महाराष्ट्रचे मुख्यसंपादक मा.अंकुश हिंमतराव कडू साहेबांना वाढदिवसाच्या आभाळ भरभरून हार्दिक शुभेच्छा! खरे तर आज प्रकाशित झालेला हा माझा लेख कालच्या अंकात येणे आवश्यक होता. परंतु मा.कडू साहेब हे आपले बालपण व खडतर जीवन यांवर सांगायलाच तयार नव्हते. या माहितीसाठी मी ६ ऑगस्ट रोजी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत अख्खा दिवस साहेबांच्या संपर्कात होतो. आपल्या आईवडिलांची गरीब परिस्थिती व आपणही स्वतः वृत्तपत्र घरोघरी वाटप करणे, मोलमजुरी करता करता आपले शिक्षण पूर्ण करणे, या गत गोष्टी पुन्हा का उकरून काढाव्यात? असे त्यांना कदाचित वाटत असावे. म्हणून ते मला आपले शिक्षण व कौटुंबिक माहिती सांगण्यास संकोच करत होते. तरीही आपण त्यांचा पिच्छा सोडला नाही. मुख्यसंपादक साहेबांनी तर मला एक निर्वाणीचा इशारा दिला, की एवढ्याच माहितीच्या आधाराने लिहिता येत असेल तर लिहा, अन्यथा लिहूच नका! शेवटी संकोचतच काही अतिशय खडतर व कष्टप्रद प्रसंग दडवूनच मला जी थोडी थोडकी माहिती दिली, तीसुद्धा शेतकरी, मजूर, कष्टकरी व विद्यार्थी या सर्वांना आपण यशोशिखर कसे सर करावे? याविषयीची अतिव प्रेरणा देणारीच आहे, असे माझे ठाम मत आहे. तलावाला शोभा देणारे कमळपुष्प सर्वांच्या परिचयाचे आहे. तो पाण्याच्या वर येऊन आपले सर्वांगसुंदर रूप जगाला प्रदर्शित करतो. मात्र, इथवरचा त्याचा उतुच्च प्रवास हा खडक, माती, चिखल, घाण पार करत झालेला असतो, हे फारच कमी- बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना माहित असते. ती माहिती काढणाराही चिखलाने बरबटत असतो; मानसन्मान पणाला लावतो, परंतु त्याचे गुढ रहस्य जगासमोर मांडतोच मांडतो. अगदी तसेच मा.कडू साहेबांच्या बाबतीत झाले आहे. मा.अंकुश साहेब, आपले हे कर्तृत्व अनेकांचे नैराश्य दूर करणारे आहे. तुम्हाला त्याची महती कशी काय बरे कळेल? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे-
“मृगाचिया अंगी कस्तुरीचा वास|
असता ज्याचा त्यास नसे ठावा||”
वाशिम येथून प्रकाशित होणाऱ्या सुवर्ण महाराष्ट्र या दैनिकाचे सर्वेसर्वा, संचालक, मालक व मुख्यसंपादक आदरणीय अंकुश हिंमतराव कडू हे आहेत. याच मुख्यसंपादक साहेबांचा जन्म दि.७ ऑगस्ट १९८८ रोजी सर्वसाधारणपणे एका गरीब कुंटुबात झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव सौ. सुंनदाबाई तर वडिलांचे नाव हिंमतराव! नावाला साजेशीच त्यांच्यात गरीबीला टक्कर देण्याची हिंमत होती. मा.अंकुश साहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षणी साथ देणारी जीवनसाथी- त्यांच्या पत्नी सौ.माधुरीताई आणि साहेबांच्या प्रत्येक पाऊलावर पाऊल ठेवत मार्गक्रमण करणारा मुलगा चि.रुद्रा हे आज त्यांच्या या उदयोन्मुख कार्याचे खरे साक्षीदार आहेत. मा.अंकुश कडू साहेबांनी मला परवाच्या दिवसभरच्या मुलाखतीत डोळे पाणावून सांगितले, “गुरूजी, आम्ही माझ्या बालपणी शेतात खुपच खपलो, काबाडकष्ट व मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह चालवित होतो. आमची परिस्थिती खुप हालाकीची होती, त्यामुळे आम्ही सर्वजण शेतमजुरी करण्याकरीता जात होतो. लहानपणी खुप कष्ट सोसले हो! लहानपणासूनच मला गरजूंना मदत करण्याची आवड होती आणि आजही आहे. माझे शेत हे रोडवर असल्याने अनेक अपघात घडतात, तेव्हा कशाचीही पर्वा न करता अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातो. आता तर अन्याविरुद्ध लढा देण्याची माझ्यात कुवत निर्माण झाली; ती याच वृत्तपत्रातून दाखवून देत आहे, ते तर तुम्ही बघताय. माझ्या शिक्षणात आर्थिक अडचणी खुप आल्या. अगदी सकाळी घरोघरी दैनिक अंक टाकून शेतात काम करून पुस्तक घेण्याची वेळ आमच्यावर आली होती. काम करणे आणि शाळेत जाणे, एवढेच मला माहित होते. ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या घेण्यास पैला पै जोडावी लागायची. ते आमचे अतिशय वाईट दिवस होते हो गुरूजी! कणभर अन्न तर सोडाच, नुसत्या पाण्यावरच काही दिवस काढले; ते दिवस आठवले तर आजही डोळ्यात पाणी येते!” हे ऐकून माझेही मन गहिवरून आले. म्हणून म्हणतोय, की साहेब! तुम्ही आज वाचकांसमोर अतिशय प्रेरक व्यक्तित्वाचे धनी झालात, वाढदिवसाच्या मंगलप्रसंगी तुमचे खुप खुप अभिनंदन!
मा.कडू साहेबांनी पुढे अनेक वार्तापत्रांमधून कामे केलीत. त्यांनी स्वतः काही दिवस कारंजा हुंकार नावाचे साप्ताहिक यशस्वीरीत्या चालविले. वाचक संख्या कमी आणि आर्थिक बाजू कमकुवत ठरल्याने ते थांबविले. नंतर त्यांनी एका दैनिकात काम करत असताना गावातील काही विरोधी गटातील नागरिकांनी त्या दैनिकाकडे त्यांची बदनामीकारक तक्रार केली. त्यामुळे त्यांच्या बातम्या आठ दिवसापर्यंत प्रकाशित करण्यात आल्या नाहीत. मग त्यांनी स्वतः दैनिक चालविण्याचे ठरविले. ते हेच आहे सुवर्ण महाराष्ट्र! ते आज अख्या महाराष्ट्रात सुवर्ण झळाळीने चमकत आहे. प्रथम ग्रामीण भागातून पत्रकारीतेची सुरुवात करून अनेक मजल दर मजल अडचणीचा सामाना करत आपले वेगळे अस्तित्व व अमिट छाप निर्माण केली. पत्रकारीतेतील अल्पावधीतच हेच दैनिक सुवर्ण महाराष्ट्रच्या रुपाने राज्यभर गाजलेले नाव अर्थात अंकुश कडू! त्यांची निर्भीड पत्रकारीता आपण सर्व जवळून बघत आहोत. या दैनिकाने अल्पावधितच अनेक दबलेल्या घटनांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. यासाठी निर्भीड लिखाण करत मालिकांच्या मालिका चालवून प्रशासन आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले. मा.अंकुश साहेब, आपल्या नावाप्रमाणे आपल्या दुःखद भावनांना अंकुश लावा आणि आपल्या खडतर जीवनातील प्रसंग माझ्यासारख्या जवळ मनमोकळेपणाने व्यक्त करत जा. कारण पुढची पिढी मान्यवरांच्या प्रेरणा घेऊन आपलेही भवितव्य उज्ज्वल करतील. जशी ही शायरी-
“पानी में पत्थर मत फेको; उसे पिने वाला कोई और हैं!
दर्द वाली कहानी मत छिपाओ;
क्योंकि देखकर जिने वाला कोई और हैं!!”
पुनश्च मुख्यसंपादक मा.कडू साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.