दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शुद्ध चिताच्या ठायी दुर्गुण स्थिरावत नाही.महणुन आपलं चित्त, अंतःकरण हे सदैव पवित्र ठेवता आलं पाहिजे . कारण अपवित्र अंतःकरणातुन दिव्य दृष्टीचा उदय होत नाही .प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काहीतरी उत्तम, अतिउत्तम, किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व होऊन नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल व्यक्तित्व घडत असताना अनेक वेगवेगळे गुण कौशल्य कारणीभूत असतात.आणि या सगळ्या मध्ये महत्वाची बाब आहे ते म्हणजे पवित्र अंतःकरण आणि आपलं अंतःकरण शुद्ध ठेवता येण खुप आवश्यक आहे.त्यासाठी आपले संस्कार,सहवास,संगत, वातावरण याचा प्रभाव पण ब-यापैकी जबाबदार असतोच . जीवन म्हणजे जणुकाही वेगवेगळ्या घटना घडामोडी . दुर्घटना, अपघातांनी भरलेला रणसंग्राम च असतो . आणि यामध्ये आपला विवेक आणि दृष्टी हि दिव्य असली पाहिजे. तेव्हा या समरातील आपला विजय निश्चित असतो . आणि दिव्य दृष्टी असण्यासाठी पवित्र अंतःकरण असणं गरजेचं आहे.कारण अपवित्र अंतःकरणातुन दिव्य अशी दृष्टी प्रकाट होत नाही. आपणं चांगले दिसावेत यासाठी आपणं काय करत नाहीत? आंघोळीसाठी वेगवेगळे उटणे,साबण वापरतो, एवढ्यावरच न थांबता चांगलं दिसलं पाहिजे या विवंचनेतून आपण वेगवेगळ्या पद्धतीची सौंदर्य प्रसाधने वापरून चेहरा सजवतो . तसेच जास्ती जास्त चांगल्या पद्धतीचा पेहाराव आपण करण्याचा प्रयत्न करतो . मग अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे असा विचार आपण कधी केलेला आठवतो का? आणि केला असेल तर मग आपण नक्कीच स्वतःच्या नजरेत तरी योग्य आहेत .निसर्गातील कोणतीही चांगली गोष्ट निर्माण होण्यासाठी , योग्य पुरक , सकारात्मक, निसर्गाशी सुसंगत अस वातावरण अपेक्षित असतं .पोषक आणि योग्य अशा वातावरणात चांगल्या बाबींचा उदय होत असतो म्हणून जर आपल अंतःकरण अशुद्ध , अपवित्र, असात्विक असेल तर त्याचा आपल्या जीवनावर तसेच दृष्टीवर दुरदृष्टी नक्कीच परिणाम जाणवेल . कारण अपवित्र अंतःकरणातुन दिव्य अशी दृष्टी प्रकाट होत नाही. आणि दिव्य दृष्टी नसेल तर जीवनात विविध अपघातांना सामोरे जावे लागते.महणुन आपण आपलं अंतःकरणात कसं शुद्ध आणि सात्विक राहील यासाठी निरंतर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्धता पवित्रता हि जीवनात असण खुप महत्वाची बाब आहे . वरकरणी बाह्य शुद्धते पेक्षा अंतर्गत अंतःकरणा ची पवित्रता शुद्धता हि खूप आवश्यक असते .ज्याचं अंतःकरण सात्विक आहे. त्याच मन बुद्धी, विवेक, आणि दृष्टी हि सुद्धा सात्विक असते . आणि आचरण आपोआप पवित्र असत.तयासाठी काही वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणून आपलं अंतःकरण हे सदैव सात्विक आणि पवित्र ठेवता आलं पाहिजे. कारण . आपलं अंतःकरण जसं आहे तसं आपली व्यक्तिगत व सार्वजनिक क्षेत्रातील वागणूक आचरण असतं.आणि आपली दृष्टी पण त्याच पद्धतीची असती. म्हणून च आपलं इतरांच्या विषयीच मत हे आपल्या अंतःकरणातील कार्यरत असणारा जो स्थिर भाव आहे नुसार ठरत असतं .मग ते कोणत्याही विषयावरील मत असो किंवा आपली भुमिका असो . त्याचा मुख्य स्तोत्र हा आपलं अंतःकरण च असतो . म्हणून अंतःकरणातील शुद्धता सात्विकता, पवित्रता, हि जाणीव पुर्वक जोपासली पाहिजे. जेणेकरून आपल्या अंतःकरणातुन दिव्य दृष्टी च प्रकट होईल .कारण अपवित्र अंतःकरणातुन कधीच दिव्य दृष्टी प्रकाट होत नाही.याचे साक्षीदार हे युगोयुगोपासुन निर्माण झालेल्या घडामोडी, निसर्ग , विविध धार्मिक ग्रंथ,व इतिहास आहे.पवित्र ,निष्पाप , निष्कलंक , निःसंदिग्ध अंतःकरण हे साक्षात पवित्र अशा तिर्थक्षेत्रा इतकं महान असत . जर आपल अंतःकरण पवित्र निर्मळ , निष्पाप असेल तर आपली दृष्टी हि दिव्याच असते . कारण अपवित्र अंतःकरणातुन कधीच दिव्य दृष्टी चा उदय होत नाही .हा निसर्गाचा अलिखित नियम आहे. आपलं अंतःकरण चित्त शुद्ध राहण्यासाठी आध्यत्मिक ज्ञान, वाचन, सात्विक वृत्ती जोपसाण न्याय,निति, धर्म शास्त्रानुसार आचरण, सुसंगत, सहवास, सकारात्मक विचारांचा प्रभाव , आजुबाजूला असणार वातावरण चांगल्या पद्धतीच असणं आवश्यक असतं जेणेकरून आपलं अंतःकरण आपोआप शुद्ध आणि सात्विक होईल व आपली दृष्टी दिव्य होईल
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301