दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मिञांनो ही कहाणी आहे एक अश्या राज्या ची जिथे दर 5 वर्षानंतर एका राजा ला चेंज करत असतात. मित्रानो जेव्हा कोणत्याही राजा चे 5 वर्ष पूर्ण होत असत, तेंव्हा त्यानंतर त्या राजाला चेंज करत असतात आणि त्या राजाला एक अश्या भयानक जंगलामध्ये पाठवत असतात.
जिथे खाण्या पिण्याची अजिबात सोय नसते आणि तिथे खूप जंगली प्राणी असतात, जे त्यांना खाऊन टाकत असतात. मित्रानो त्यानंतर एका राजा चे 5 वर्ष कंप्लीट होतात आणि मग त्या राजाला नवीन कपडे घातले जातात आणि त्या राजाला एका हत्तीवर बसवून त्या राजाला गूड बाय करण्यासाठी त्याला एका बोट मध्ये बसवले जाते.
आणि त्यानंतर त्या राजाला पाठवले जाते अश्या जंगलामध्ये जिथे खाण्या पिण्यासाठी काहीच सोय नसते आणि तिथे जंगली प्राणी खूप असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात. मित्रानो जसे त्या राजाला त्या जंगलामध्ये पाठवले जाते, त्यानंतर त्या राज्याचे लोक विचार करतात की आता आमच्या राज्याचा नविन राजा कोण बनणार?
त्यानंतर त्या राज्यातील लोकांना कळते की आपल्या राज्यामध्ये एक असा व्यक्ती आहे, जो खूप हुशार आहे आणि त्याला आपल्या राज्याचा राजा बनवला पाहिजे. त्या नंतर त्या राज्याची सर्व लोक त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी जातात आणि त्या हुशार व्यक्तिला रिक्वेस्ट करतात की तुम्ही आमच्या राज्याचे नवीन राजा बनणार काय?
तर तो हुशार व्यक्ती त्यांना नाही म्हणतो, कारण त्याला आधीच सांगितले जाते की आम्ही आमच्या राज्यामध्ये दर 5 वर्षाला राजा चेंज केला जातो आणि त्या राजाला एका अश्या जंगला मध्ये पाठवले जाते, जिथे त्याला खाण्या पिण्यासाठी काहीच नसते आणि त्या जंगला मध्ये खूप जंगली प्राणी असतात जे त्यांना खाऊन टाकतात.
त्यानंतर त्या राज्याची सर्व लोक त्या हुशार व्यक्ति ला खूप रिक्वेस्ट करतात की तुम्ही खूप हुशार आणि चालाक आहात आणि तुम्ही आमच्या राज्याला खूप चांगल्या प्रकारे चालवाल. त्या सर्व लोकांच्या request नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा राजा बनण्यासाठी तयार होतो.
आणि त्या राज्याच्या लोकांच्या सर्व अटी ना पण स्वीकारतो, की मला माझे 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला अशा जागेवरती पाठवले जाईल जिथे अजिबात जीवन नाही ये. त्या नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा नवीन राजा बनतो, तेझ्या 3 दिवसानंतर तो नवीन राजा आपल्या लोकांना विचारतो की “कोणते आहे ते ठिकाण जिथे सर्व राज्यांना 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठवले जाते.”
त्या जागेची माहिती घेतल्यानंतर तो राजा आपल्या लोकांसोबत त्या ठिकाणी भेट देतो आणि तिथे जाऊन पाहतो की तिथे खूप राजांची मृतदेह पडलेले आहेत, आणी ते जंगल इतके घनदाट आसते की तिथे वेगवेगळ्या प्रकारची जंगली प्राणी राहत असतात.
हे सर्व पाहिल्यानंतर तो राजा आपली बुध्दी चालवतो आणि एक जबरदस्त प्लानिंग करतो. मित्रानो तो नवीन राजा त्या 5 वर्षामध्ये एक जबरदस्त प्लानिंग करतो आणि त्या प्लानिंग वर लगेच काम करायचा सुरुवात करतो.
जेव्हा तो राजा हे पाहतो की हे खूप घनदाट जंगल आहे आणि येथे खूप जंगली प्राणी आहेत आणि माझे 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला येथे पाठवले जाणार आहे, तेव्हा राजा असा विचार करतो की “5 वर्षानंतर मला तर येथे अजिबात यायचे नाही आणि यासाठी मला काही तरी केले पाहिजे.”
त्यानंतर तो नवीन राजा पहिल्या वर्षी त्या जंगला मधील सर्व झाडे कापून काढतो आणि त्या जागेवरच्या अश्या सर्व वस्तूंना काढून टाकतो, ज्यामुळे ते जंगल एवढे घनदाट दिसत होते. आणि तेथील साऱ्या जंगली प्राण्यांनाही तेथून काढून टाकतो.
दुसऱ्या वर्षी तो राजा त्या जागे वरती अजून काम करतों आणी त्या जागेला असे बनवतो की ते जंगल वाटले नाही पाहिजे. तिसऱ्या वर्षी त्या राजा ने त्या जागी एग्रीकल्चर चे काम सुरू केले गेले आणि चौथ्या वर्षी त्या ठिकाणी बिल्डिंग, कॉम्प्लेक्स आणि रस्ते बनवण्यास सुरू केली.
मिञांनो पाचव्या आणि शेवटच्या वर्षी त्या राजाने त्या ठिकाणावरती घरे बांधण्यासाठी आणि तिथे लोकांना राहण्यासाठी पण व्यवस्था करुन दिली गेली. आणि राजा हे सर्व काम करण्यासोबत तो बचत पन खूप करत होता आणि खर्च ही खूप कमी करत होता.
कारण ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सोडल्यावर ते सर्व पैसे तो खर्च करू शकेल “ज्याला तो गेल्या 5 वर्षा पासून तयार करत होता. मित्रानो त्या नंतर जसे त्या राजाचे 5 वर्षे कंप्लीट होतच असतात, तेव्हा तो राजा आपल्या राज्याच्या माणसांना म्हणतो की 👇👇👇
माझे 5 वर्षे आता कंप्लीट होणारच आहेत तर तूम्ही मला आता त्या जागेवर पाठवून द्या, ज्या जागेवर तुम्ही मला पाठवणार होता. तेव्हा त्या राज्याचे सर्व लोक त्याला असे म्हणतात की आजुन तुमची 5 वर्ष पूर्ण झाली नाही येत आणि 5 वर्ष कंप्लीट होण्यासाठी आजुन 10 दिवस बाकी आहेत.
मित्रानो त्या राजाला खूप Excitement होत असते, कारण राजाला त्या ठिकाणी पाठवणार होते, जिथे गेल्या पाच वर्षांपासून त्याने त्याच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची तयारी आधीच करून ठेवली होती.
जसे त्या राजाची ५ वर्षे पूर्ण होताच त्या राजाला ही नवीन वस्त्रे परिधान करण्यात येतात. आणि त्या राजाला गूड बाय करण्यासाठी त्याला हत्तीवर्ती बसवून त्याला त्या ठिकाणी पाठवले जाते. परंतु त्या राज्यातील लोकांनी असे पाहिले की , राजाला त्या ठिकाणी पाठवले जात आहे तरी ही तो राजा खुश आणि हसत जातआहे.
मित्रानो हेच्या आधी दर 5 वर्षानंतर असे होत होते की जेव्हा पण त्या राज्यातील राजाचे 5 वर्ष कंप्लीट होत होते, तेव्हा ते सर्व राजे रडत रडत जात होते, परंतु हा हुशार राजा हसत हसत जात आहे. मित्रानो जेव्हा लोकांनी त्या हुशार राजाला विचारले की तुम्ही हसत का आहात? म्हणजे तुम्ही इतके खुश का आहात?
तेव्हा तो हुशार राजा सर्वांना सांगतो की जेव्हा तुम्ही ह्या जगा मध्ये येता म्हणजेच जेव्हा तुमचा जन्म होतो, तेव्हा सर्व जग खुश आसते आणि तुम्ही रडत असता, परंतु जाता जाता असे काही तरी असे करून जायचे की संपूर्ण जग रडेल आणि तुम्ही हसत हसत जाल.”
मित्रानो ही लाईन तुम्ही खूप वेळा लोकांच्या तोंडून एकली असेल. ठीक त्याच प्रमाणेच त्या राजाने तसे केले, त्यान आपली जिंदगी अशी बनवली होती की तो हसत हसत त्या ठिकाणी जात होता.
मित्रानो त्यानंतर तो राजा म्हणतो की हे च्या आधी जितके राजा आले होते ते त्या 5 वर्षा मध्ये राज्य चालवण्यात, ऐश आणि मज्या करण्यामध्ये एवढे हरवून जात होते की, ते हे विसरून जात होते की 5 वर्षानंतर त्यांना एका अश्या ठिकाणी पाठवले जाणार आहे की जिथे त्यांना मरावे लागणार आहे.
परंतु मी या 5 वर्षामध्ये त्या जागेला व्यवस्थित केले कारण मला माहित होते की 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला तिथे पाठवले जाणार आहे. एक अश्या ठिकाणी जिथे जीवन नाहीये. म्हणून मी त्या वरती काम केले आणि माझ्याकडे काम करण्यासाठी हाच टाईम होता.
मी राज्याचा राजा जरूर होतो पण मी हे विसरलो नाही की माझा येणारा टाइम कसा असणार आहे, म्हणून मी माझ्या भविष्याची प्लानिंग केली आणि त्या वरती काम करणे सुरू केले. मित्रानो तो हुशार राजा जेव्हा राज्य सोडून जातो तेव्हा तो खुशी मध्ये जातो.
जाताना तो आपली सेविंगस पण आपल्या सोबत घेऊन जातो, जी त्याने गेल्या 5 वर्षामध्ये केली गेली होती. राजा बनल्यानंतर त्याने जास्त खर्च पण केला नव्हता आणि त्या राजाने आपले भविष्य संभाळले आणि त्यावर त्याने काम केले.
डि. एस. लोखंडे पाटील
मुख्य संपादक – दै चालु वार्ता