दै चालु वार्ता वृत्तसेवा :
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था उणे २० खाली गेलेली असतानाही फक्त शेतीमुळे अर्थव्यवस्था टिकून आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची उपजीविका शेतीवर चालत आहे. मात्र, मूठभर भांडवलदारांच्या हितापोटी शेतकऱ्य़ांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याची भावना कॉ. सुखदर्शनसिंग यांनी व्यक्त केली.
जोपर्यंत शेतकरीविरोधी तीन कायदे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही. शेतकऱ्य़ांच्या एकजुटीपुढे सरकारला माघार घ्यावीच लागेल, असा विश्वास दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंजाब किसान युनियनचे उपाध्यक्ष कॉ.सुखदर्शनसिंग नठ यांनी व्यक्त केला.
श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी सभा व अखिल भारतीय किसान महासभा यांच्या वतीने राज्यभर केंद्र सरकारच्या लोकशाही आणि संविधानविरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संवाद यात्रे दरम्यान नगरमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात कॉ. सुखदर्शनसिंग बोलत होते. यावेळी बिहार भाकपचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद, अ. भा. किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. राजाराम सिंग, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. किशोर ढमाले, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. आनंद वायकर, कॉ. अनंत लोखंडे, कॉ. जीवन सुरुडे उपस्थित होते.तसेंच
या आंदोलनात देशातील शेतकरी संघटित होत आहेत. विरोधाभास म्हणजे आरएसएसप्रणित भारतीय किसान संघानेदेखील कायद्यांना विरोध केला आहे. मोदी-शहांच्या मर्जीने अदानी-अंबानींकरता चालणारे सरकार हे कायदे मागे घ्यायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुदामा प्रसाद, कॉ. किशोर ढमाले यांची भाषणे झाली. पाहुण्यांचे स्वागत स्वागत कॉ. आनंदराव वायकर यांनी केले. आभार कॉ. अनंत लोखंडे यांनी मानले.