दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : मंगळवारी (२१ सप्टेंबर) अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला असं वचन दिलं आहे की, ‘राज्यात जर आपचं सरकार सत्तेत आलं तर तर भ्रष्टाचार थांबेल.‘ त्याचबरोबर, यावेळी केजरीवाल यांनी तरुणांना रोजगाराबाबत देखील मोठी आश्वासनं दिली आहे.‘आप राज्यातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून देईल. प्रत्येक घरातील एका बेरोजगार व्यक्तीला शासकीय नोकरी मिळेल आणि कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना ३ हजार रुपये भत्ता मिळेल‘, अशी घोषणा केजरीवाल यांनी दिली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात नोकरी आणि बेरोजगारीबाबत सात मोठ्या घोषणा केल्या आहेत. आणि
विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल असंही म्हणाले की, ‘राज्यातील ८० टक्के नोकऱ्या गोव्यातील रहिवाशांसाठी राखीव असतील.‘ आम आदमी पार्टीने केलेल्या ट्विटनुसार, गोव्यासाठी पक्षाने मोठ्या घोषणा केल्या आहेत. पर्यटन क्षेत्रात करोनामुळे बेरोजगार झालेल्यांना दरमहा पाच हजार रुपये आणि खाणीचं काम थांबल्याने बाधित झालेल्या लोकांना दरमहा पाच हजार रुपये दिले जातील. आपचं सरकार सत्तेत आल्यास कौशल्य विद्यापीठ सुरू करेल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.