दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मशालिचा इतिहास हा तसा जुनाच आहे. कारण एकेकाळी बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसेनेचा हे चिन्ह राहिलेले आहे. त्यामुळे आता सगळीकडे एकच चर्चा आहे. पुना मशाल क्रांती घडणार का?
तसं कालचे स्टेटमेंट आहे संजय राऊत म्हणाले शिवसेनेचे हे नविन चिन्ह क्रांती घडवणार !
ज्यावेळेस 1985 ला विधानसभेची पहिली निवडणूक शिवसेने लढवली होती. त्यावेळेस छगन भुजबळ हे या चिन्हावर निवडून आलेले पहिले आमदार ठरले होते.
पुना त्यानंतर 1985 ला जस महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुका स्वबळावर लढून जिंकण्याचे ठरवलं होतं. आणि त्या वेळेस त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं होतं. आणि त्या वेळेस हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नगरपालिकेला 70 ते 75 नगरसेवक निवडून आणून सत्ता स्थापन केले होती.
1985 पुना पुनरावृत्ती होणार का? हा जनसामान्यांमध्ये आणि लोकांच्या मनामध्ये प्रश्न घुमत आहे.
माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक लाईट मधून बोलताना सांगितले. ही आपली शेवटची लढाई म्हणून लढा ( अंधेरीचीं पोट निवडणूक ) आता इथे मात्र एक गोष्ट नक्कीच नमूद करण्यासारखे आहे. जर का अंधेरी ची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना जिंकली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मध्ये मशाल क्रांती घडून आणू शकते.
पण उद्धव ठाकरे यांना अंधेरी ची पोटनिवडणुकीची सोपी जाणार नाही. कारण अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये पुना उद्धव ठाकरे याचं कस खची करायचा याची तयारी कदाचित शिंदे गट आणि बीजेपी कडून केली असावी. बीजेपी आणि शिंदे गटाचा हा विजय मिळवण्यासाठी आठासचं आहे.
एकंदरीत गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामधील राजकारणाची परिस्थिती ज्या पद्धतीने चालत आहे. ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे हे पूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेला आहे. कदाचित महाराष्ट्रातील जनताही अशा घाणेरड्या राजकारणाला बहुधा कंटाळली असावी. कारण महाराष्ट्रातील रती महाराती सत्तेतील राजकारणी मंडळी एकमेकांना संपवण्याच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्याची हाल-अपेष्टा, शेतकऱ्यांची होणारी हानी, सामान्य लोकांकडे होणारे दुर्लक्ष,वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, ह्या सर्व गोष्टी कडे लक्ष देण्यासाठी कदाचित आता तरी त्यांच्याकडे वेळ नसावा कारण ते एकमेकांना संपवण्याच्या नादात व्यस्त आहेत असं जनतेचं मत आहे.
मागे सोशल मीडिया वरती काही बातम्या माध्यमाद्वारे ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी मिळाल्या. ते म्हणजे शिंदे आणि शिवसेनेने गटाचा दसरा मेळावा आणि यामध्ये सभेला गर्दी जमवण्यासाठी लागलेली चढाओढ ती पूर्ण महाराष्ट्राने बघितली . दसरा मेळाव्यात सत्ते मधील नेत्यांनी महाराष्ट्र वरती बोलायचे सोडून जिथून आले, ज्याच्या कडून आले, त्यांच्यावरच बोलायला सुरुवात केली. आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नावर ती कोणीही बोलायला तयार नाही. हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेला आहे.
सोशल मीडिया वरती काही गोष्टी अजून ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रामाणिक आणि निस्वार्थ पणा, कदाचित त्याचाच फायदा येणाऱ्या काळामध्ये मशालीच्यां क्रांतीला होऊ शकतो. असं जनतेचे मत आहे.
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ते अगदी बरोबरचं आहे ?
अंधेरी ची पोटनिवडणूक जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी जिंकली तर नक्कीच, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणायला हरकत नसणार आहे. पुन्हा येणाऱ्या महानगरपालिका आणि इतर निवडणूक मध्ये या चिन्हाचा नक्कीच फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला चांगल्याप्रकारे होण्याचे शक्यता आहे.
येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे.
डी. एस.लोखंडे पाटील
संपादक दैनिक चालु वार्ता